Home Storys बदलापूर क्वारंटाईन सेंटर मद्ये लोकांचा धिंगाणा !

बदलापूर क्वारंटाईन सेंटर मद्ये लोकांचा धिंगाणा !

115
0
SHARE

बातमी आहे बदलापूरची, काही दिवसांनपासुन एक विडिओ सोशलमिडीया वरती वायरल होत आहे !
ज्या मद्ये बदलापूरच्या एका क्वारंटाईन सेंटरमद्ये लोक तिथे होणाऱ्या गैरसोई बद्दल बोलत आहेत,
कोरोना रुग्नांची दिवसागणिक संख्या वाढत आहे यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण येत आहे,
असे तर्क दिली जातात, पण यामागचे गौडबंगाल काही निराळेच आहे. हे हळूहळू स्पष्ट होत आहे, कशाचे कशाला ताळमेळ नाही सरकारी अधिकारी लोकांना उपचार व सुविधा देण्याच्या नावाने सरकार च्या तिजोरीतला हवा तेवढा पैसा खर्च करत आहे व ह्या मद्ये आपले टक्के पण जोडत आहेत,भविष्यात जर ह्याची चौकशी झाली तर ह्यात घोटाळा मिळाल्यास नवल नसावे ! ठीक आहे हे भविष्यात होईल तेव्हा होईल.

Credit line-social media

पण “अरे बाबांनो” एवढ्या मोठ्या संकटात लोक ह्या महामारी चा सामना करत आहेत, बहुतेक लोकांचे संसार व आयुष्य बरबाद झालेत तरी “लोक धीरानं घेताय ” लोकांच्या ह्या धीराची परीक्षा घेऊ नका, नाही तर स्फोट व्हायला वेळ लागणार नाही, चांगले जेवण तर सोडा, लोकांना वेळेवरती जेवण मिळत नाही आहे, क्वारंटाईन सेंटर मद्ये स्वच्छता राखली जात नाही, लोकांना जनावरासारखं डामले जात आहे ह्यामुळे काही लोकांनाचा मृत्यू देखील झाला आहे, जर काही जना मनाची लाज राहिली असेल तर ह्या वरती लक्ष द्यावे व लोकांची भावना समजून घ्यावीत !
लेखक : योगेश कापुरे