30-11-19
संपादकीय –
कळस.. माणुसकीला काळिमा फासणारी घटना, कधी कधी तर विचार पडतो की ज्या समाजात आपण रहात आहोत त्यात माणसच राहतात की जनावर..नेहमी आपल्या पेक्षा कमजोर असणाऱ्या वरती अत्याचार होत राहतात.. अरे नराधामणो काही तरी तमा बाळगा ज्याला आपल्या स्वरंक्षणाची गरज आहे हे समाज कंटक नेहमी त्याचीच बळी घेतात.
आजची घटना ही काही अशीच आहे !
डॉक्टर ज्याला आपल्या देशात देवा ची उपमा देतात कारण तो जीवन दान देतो मार्त्याला जिवंत करतो, भले तो माणूस असो वा पशु, डॉक्टर आपले काम तेवढ्याच आत्मेयतेने करतो.
आणि आज त्याच डॉक्टर च्या शरीराचे वाभाडे काढले गेले !
डॉक्टर प्रियांका रेड्डी- काय चूक होती तिची की “ती मुलगी होती!भारतात मुलगी होणे चूक आहे का..? हाच प्रश्न तिचा आत्मा विचारात असणार आपल्या सर्वाना..का विश्वास ठेवला मी की मला एवढी पीडा सोसावी लागली..आज मी उद्या आणखीन कोणी परवा आणखीन कोणी दुसरी, तिसरी हे निरंतर चालतच राहणार का..? आज हा प्रश्न प्रत्येक मुलगी, आई,बाहिनेच्या मनात खदखद करत असणार, क्रूरतेचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा बलात्कार केल्या नंतर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.ह्यांच्या घरी आया बहिणी नसणार का, जर त्याच्या सोबत असे काही घडले असते तर..?
खूप शरमेची बाब आहे की निरंतर अस्या घटना आपल्या समाजात होत राहतात पण ज्यांना आपण आपल्या स्वरक्षणा साठी निवडून पाठवतो ते निश्चिंत दिसतात, का नाही एवढे कडक कायदे करत ज्याने अस्या मनोवृत्ती च्या नराधमाची चूक करण्या आदी आत्मा कापली पाहजे, का नाही.. का नाही..? शेवटी काय तर रामाच्या देशात सीतेला नेहेमी अग्नीत जावेच लागत आहे