Home Uncategorized अबबब !लॉकडाऊन दरम्यान पण गुण्यात भरमसाट वाढ !

अबबब !लॉकडाऊन दरम्यान पण गुण्यात भरमसाट वाढ !

152
0
SHARE

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 81 हजार गुन्ह्यांची नोंद झाली.
तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या 159 घटना घडल्या. त्यात 535 व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत कलम 188 नुसार 81,063 गुन्हे नोंद झाले असून 16,548 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 85 लाख 50 हजार 394 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
100 नंबरवर भडिमार
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या 100 नंबर वर प्रचंड भडिमार झाला. या काळात 79,901 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 618 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 1,55,076 व्यक्ती

Quarantine आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1107 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 49,113 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिसांसाठी दवाखाने राखीव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 14 पोलीस अधिकारी व 85 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. राज्यात एकूण 4785 हजार रिलिफ कँम्प आहेत. जवळपास 4,97,256 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊन च्या काळातील सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here